टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

प्रतीज्ञेचा इतिहास

राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली?

      राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिलीभारतातील प्रत्येक

भाषेतील , प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरातराष्ट्रीय प्रतिज्ञा छापलेली असतेपण आजवर ती कुणी लिहिली , तेचठाऊक नव्हतेअगदी पाठ्यपुस्तक मंडळालादेखीलपरंतु गेल्या वर्षी याप्रतिज्ञेच्या कर्त्याचे नाव अचानक उजेडात आलेत्याची ही शोधकथा...देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एकसमान प्रतिज्ञा प्रत्येकविषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असतेअनेक वर्षांपासूनआपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत असतो.परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ? कधी लिहिली ? ती केव्हापासूनदेशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली , याची माहिती जवळपासकोणालाच दिसत नाहीमीही ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणतआलो.
    बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा धडा किंवा कविता वाचली कीत्या पाठाखाली किंवा धड्याखाली त्या-त्या लेखकाचे , कवीचे नावदिलेले असतेत्यामुळे मला बालपणापासूनच पाठ्यपुस्तकातली हीप्रतिज्ञा कोणी लिहिली असेल , असा प्रश्न पडला होतामलाशिकविणाऱ्या प्रत्येक वर्गातील शिक्षकाला मी हा प्रश्न विचारीत असे.परंतु कुणीच मला उत्तर देऊ शकले नाहीपुढे बऱ्याचशिक्षणाधिकाऱ्यांना , विद्वानांना , पाठ्यपुस्तक मंडळातील तज्ज्ञांना ,शिक्षणमंत्री , साहित्यिक , लेखक , भामराठी साहित्यमहामंडळावरील सदस्य , तसेच जवळपास प्रत्येक शिक्षणतज्ज्ञाला याप्रश्नाचे उत्तर विचारलेसगळीकडूनच नकारघंटा आलीकाहींनीसानेगुरुजी , यदुनाथ थत्ते असावेत असे सांगितलेपण समग्रसानेगुरुजी वाचल्यावरही संदर्भ लागला नाहीयदुनाथ थत्तेंनी याप्रतिज्ञेच्या आठ वाक्यांचा सविस्तर अर्थ विशद करणारे ' प्रतिज्ञा ' नावाचेपुस्तकच लिहिले आहेया पुस्तकातही या प्रतिज्ञेच्या लेखकाचा कुठेउल्लेख आढळला नाहीपाठ्यपुस्तक मंडळातील काही व्यक्तींनीसुचविले की , ती केव्हापासून पाठ्यपुस्तकात आली , याचा आमच्याकडेसंदर्भच नाहीत्यामुळे ती कदाचित पाठ्यपुस्तक मंडळानेच कधीतरीमनात आले म्हणून तयार करून छापली असेल  पुढे तिचा हिंदी इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला असेलपरंतु प्रत्यक्ष शोधानंतर ते तसेनसल्याचे सिद्ध झाले. ' भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधवआहेत... ' ही प्रतिज्ञा भारतीय पातळीवर प्रत्येक राज्याच्या राजभाषेतभाषांतरित झालेली आहेभारतात लिपी असणाऱ्या सर्व भाषांच्यापाठ्यपुस्तकांमध्ये ती दिसतेगेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मी याप्रतिज्ञेच्या जनकाचा प्रश्नाचा शोध घेत होतो आणि शेवटी एकदाचात्याच्या उगमापर्यंत पोहोचलोआंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिकपेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञापहिल्यांदा लिहिलीपरंतु त्यांचा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकात कुठेआढळत नाही , याची खंत वाटतेआंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातीलअन्नेपर्थी या गावच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत , तेलगू ,इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झालेहोतेते नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणूनही परिचित होतेयाचबरोबरविशाखापट्टणम् जिल्ह्याचे अनेक वर्षं ते जिल्हा कोषागार अधिकारीम्हणून सरकारी नोकरीत होतेत्यांची ' कालाभरवाहू ' नावाची तेलगूकादंबरी विशेष गाजलीमुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले , स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्याजिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा १९६२मध्ये लिहिलीत्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला ही कल्पनाखूपच आवडलीत्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पीव्हीजी.राजू यांना ही प्रतिज्ञा दाखविलीशिक्षणमंत्र्यांनाही ती आवडली आणित्यांनी ती शाळाशाळांमध्ये घेण्याचा आदेश दिलाकेंद्र सरकारच्यानेतृत्वाखाली मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातीलशिक्षणखाते कार्य करीत असतेया खात्याच्या वतीने शिक्षणामध्येसातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातातयासाठी ' डेव्हलपमेंटऑफ एज्युकेशन इन इंडिया ' या समितीची स्थापना केलेली आहेयासमितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतातया डेव्हलपमेंट ऑफएज्युकेशन इन इंडियाची ३१वी सभा तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री एम.सीछागला यांच्या अध्यक्षतेखाली ११-१२ ऑक्टोबर १९६४ला बेंगळुरूयेथे झाली होतीया मिटिंगच्या वृत्तांतामध्ये (डेव्हलपमेंट ऑफएज्युकेशन इन इंडिया -  हिस्टॉरिकल सर्व्हे ऑफ एज्युकेशन डॉक्युमेंटबिफोर अॅण्ड आफ्टर इंडिपेन्डन्ट - या पुस्तकाच्या पान १४० वरमुद्दाक्र१८ मध्ये उल्लेख आढळतो की , विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावनासदोदित जागृत राहण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसारशाळा-महाविद्यालयांमध्ये , तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावरविद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावीयाला अनसुरूनच पेदेमरी व्यंकटसुब्बाराव यांनी लिहिलेली India is My Country, All Indians are my brothers & sisters... ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याचीशिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला  पुढे असेहीसूचित करण्यात आले की , ही प्रतिज्ञा देशपातळीवर २६ जानेवारी १९६५पासून लागू करावीया प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध भाषांमध्येअनुवाद करण्यात आला आणि १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्यापाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आलातसंच , या प्रतिज्ञेलाफक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा  देता , तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचादर्जा देशपातळीवर देण्यात आलापेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी हीप्रतिज्ञा १९६२ मध्ये प्रथम तेलगू भाषेत लिहिली होती. 
    २६ जानेवारी २०१२ला या प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव सुब्बारावांच्यामित्र परिवाराने साजरा केलातेव्हा ' टाइम्स ऑफ इंडिया ' आणि दैनिकहिंदू ' या इंग्रजी वृत्तपत्रांत त्याविषयीची छोटीशी बातमी प्रकाशितझालीया बातमीमुळेच माझ्यासारख्या आजच्या पिढीतील अनेकांनाआपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा खरा लेखक कोण , याची माहिती मिळाली. 
    आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जसे अनुक्रमे रवींद्रनाथ टागोरआणि बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जातेतशीच ही राष्ट्रीयप्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जायलाहवीसुब्बारावांचे नाव या राष्ट्रीय प्रतिज्ञेशी जोडले जायला हवेकारणप्रतिज्ञेचा जो आशय आहे , जे विचार आहेत ते प्रचंड विवेकवादी ,समतावादी , एकात्म समाज घडविण्याचा वस्तुपाठ दर्शवितातहाराष्ट्रीय प्रतिभेचा अमूल्य वारसा या प्रतिज्ञेच्या माध्यमातून भविष्यातहीभावी पिढ्यांसाठी आपण जतन करणार आहोतचयासाठी तरी पेदेमरीव्यंकट सुब्बाराव यांच्या प्रतिभेचा सम्मान म्हणून या प्रतिज्ञेच्या खालीत्यांची नाममुद्रा असणे गरजेचे वाटते , म्हणजे भविष्यात आपल्याराष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण ? हा प्रश्न इतरांना पडणार नाहीयाचेउत्तर प्रत्येक भारतीय नागरिकाजवळ असेल.

No comments:

Post a Comment